
मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज निवडणूक आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना ठाण्यामध्ये बिनविरोध निवडून आलेल्या सर्व घटनांचा सविस्तर लेखाजोग पत्राच्या माध्यमातून मांडला. बिनविरोध जिंकून आणलेल्या सर्व उमेदवारांची चौकशी करावी अशी मागणी या पत्रात केली आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण बाब काळजीपूर्वक समजून घेतली असून, यावर लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.” अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली